सोमवार, 8 अप्रैल 2013

संगणकावर सुगमतेने देवनागरी टंकन -- मटा लेख व सुजयची मुलाखत


संगणकावर सुगमतेने देवनागरी टंकन -- मटा लेख व सुजयची मुलाखत

संगणकपर सरलतासे देवनागरी टंकन सीखनेके संदर्भमें मैंने आकाशवाणी कोल्हापुरके लिये डॉ सुजय लेले का इंटरव्यू किया था -- सुजय रत्नागिरी जिले में यह 1 महीनेका प्रशिक्षण वर्ग चलाते हैं। यहाँ प्रस्तुत है वह साक्षात्कार --

मटातील लेख 27 फे. 2013

‘म’ मराठीचा, माहितीचा, मिळकतीचा!



लीना मेहेंदळे राज्यश्री क्षीरसागर 

इंटरनेटच्या या काळात मराठी भाषेचा वापर टिकवायचाआणि वाढवायचा असेल तर साहित्यसंस्कृतीने समृद्धअसलेल्या मराठीचं जीवनव्यवहाराशी संबंधित अनेक प्रकारचं ज्ञानाचं संचित डिजिटल असणं गरजेचं आहे .मराठी मनुष्यबळनिर्मितीचा हा एक मार्ग ठरावा बाळबोध इन्स्क्रिप्ट पद्धतीने कम्प्युटरवरील मराठीचा विस्तारवाढवून महाराष्ट्र प्रगतिपथावर जाऊ शकतो 
.. 
माहिती व तंत्रज्ञानाच्या या डिजिटल युगात महाराष्ट्रात आजचा मराठी दिवस साजरा करताना आपली मराठीभाषा लोकशाहीव्यवस्थेशी विविध समाजगटांशी माहितीशी आणि ज्ञाननिर्मिती व रोजगारनिर्मितीशी जास्तीतजास्त प्रमाणात जोडली जाणं अत्यावश्यक आहे यासाठी मराठी भाषेचा दैनंदिन व्यवहारातील व इंटरनेटवरीलवापर वाढवण्याची गरज आहे मग याद्वारे लोकशाही राबवण्यासाठी अपेक्षित असलेला सजग कृतिशील नागरिकघडू शकेल माहिती अधिकाराचा वापर वाढू शकेल जगभरात फोफावणारी नागरिक सहभागाची पत्रकारिता (सिटिझन जर्नालिझम वाढू शकेल आणि माहितीचा व ज्ञानाचा प्रसारही अधिक प्रमाणात होऊ शकेल याप्रक्रियेतून मराठी भाषकांसाठी रोजगारनिर्मितीही होऊ शकेल याकडे केवळ भावनिक दृष्टिकोनातून नव्हे तरकालसुसंगत व तर्कसुष्ट दृष्टिकोनातून पाहायला हवं विशेषतः अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी आणि सामाजिक न्यायमिळवण्यासाठी इंटरनेटचा वापर हा एक मूलभूत अधिकार मानला जावा असं जागतिक पातळीवर म्हटलं जातअसताना इंटरनेटवरील मराठीचा वापर वाढवण्यात सर्व महाराष्ट्रवासीयांनी सहभाग घेतला पाहिजे 

मराठीतील संगणकसाक्षरता वाढवणं हे सर्वांनाच इन्स्क्रिप्ट पद्धतीने सहजशक्य आहे आठवी नववीपर्यंतचंशिक्षण घेतलेली मुलं मुलीही मराठीत संगणकसाक्षर बनू शकतात तरुणाईसाठी इथे प्रामुख्याने संधी उपलब्धकरून देण्याची गरज आहे कारण डेमोग्राफिक डिव्हिडंड असं म्हटलं जाणाऱ्या गटात अशा मुला मुलींची संख्याभरपूर आहे आणि त्यांच्यासाठी रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची गरज आहे या मुलांचं शिक्षण मराठीमधूनझालेलं असतं आणि मराठी मजकूर टाइप करण्याइतपत त्यांची आकलनक्षमता वाढवता येते मराठीसाठी इन्स्क्रिप्टकी बोर्ड वापरून साधारणपणे एका महिन्याच्या प्रशिक्षणानंतर ही मुलं सहजपणे कम्प्युटरवर मराठी माहितीटाइप करू शकतात तर इंग्रजी की बोर्ड शिकून मराठी टाइप करण्यास किमान तीन महिने वा जास्त कालावधीलागतात इथे महत्त्वाचा मुद्दा असा की मराठी मजकूर टाइप करण्यासाठी इंग्रजी येण्याची गरज नाही तरमराठी भाषा व इन्स्क्रिप्ट की बोर्ड माहिती असणं पुरेसं आहे 

शहरी निमशहरी आणि ग्रामीण अशा सर्वच ठिकाणी हा प्रयोग करता येण्यासारखा आहे ग्रामपंचायतींपर्यंतकम्प्युटर पोहचवणं व कम्प्युटर वापराचं किमान प्रशिक्षण देणं हे सहजशक्य आहे रत्नागिरी जिल्ह्यातील एकाखेडेगावात बाळबोध मराठी म्हणजे इन्स्क्रिप्ट पद्धतीने दर महिन्याला सहा याप्रमाणे सुमारे ३० मुलांनी प्रत्येकी ,एका महिन्यात प्रति मिनिट १८ ते २० शब्द अशी गती मिळवली हे त्यांच्या परीक्षेअंती दिसून आले त्यानंतरलगेच दोन मुले ग्रामपंचायतीमध्ये रीतसर नेमणुकीने कार्यालयात काम करू लागली तर इतर चार पाच मुलांनारिपोर्ट तयार करण्यासाठी सातत्याने कामे मिळू लागली त्यांचे हे रिपोर्ट इंटरनेटवर ठेवल्यास ते अभ्यासासाठी निष्कर्ष काढण्यासाठी उपयुक्त ठरतील अर्थात हे पुढे घडेल पण तत्काळ फायदा म्हणजे मराठी टाइपिंगशिकलेल्या मुलांना अर्धकुशल ते कुशल या प्रकारचे काम मिळू शकेल त्यांच्यासाठी आज इंटरनेटवर मराठीतउपलब्ध असलेले ज्ञानभांडार खुले होईल वरील अनुभवानंतर नंदुरबार येथील एका खासगी प्राथमिक शाळेनेहीआठवीपर्यंत शिकलेल्या मुला मुलींना इन्स्क्रिप्ट पद्धतीने प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे 

तरुण गटाच्या मराठी भाषिक क्षमतेचा व ऊर्जेचा योग्य उपयोग करण्याला महत्त्व देण्याचं आणखी एक कारणम्हणजे आहे रे व नाही रे यांच्यातील रुंदावणारी दरी कम्प्युटर वापरता येणारे व न येणारे असे दोन गट जणूसमाजात तयार होताहेत या डिजिटल डिव्हाइडवर मात करण्याची गरज आहे या संदर्भात शहरी निमशहरीआणि ग्रामीण भागांतील वास्तव लक्षात घेण्याचीही गरज आहे भारतात आज शहरीकरणाची प्रक्रिया वेगवानबनत असली तरी बहुसंख्य नागरिक ग्रामीण वा निमशहरी भागांत वास्तव्य करून आहेत मात्र शहरांकडे होणारेस्थलांतर वाढले आहे यामुळे एकीकडे शहरांमधील गर्दी वाढतेय आणि शहरव्यवस्थापन दिवसेंदिवस अवघडबनत चाललंय शहरे बकाल होताहेत गरिबी व अस्वस्थता वाढतेय आणि दुसरीकडे निमशहरी व ग्रामीणभागातही अस्वस्थता वाढतेय शिक्षणव्यवस्थेतून बाहेर फेकले गेलेल्यांची स्थिती अधिकच बिकट होतेय अशापरिस्थितीत समाजातील वाईट प्रवृत्ती उफाळून वर येण्याचा धोका उंबरठ्यावर येऊन पोहोचलाय म्हणून ,समाजातील सर्व घटकांना कृतिशील बनण्याची संधी उपलब्ध होण्याची गरज आहे महाराष्ट्रात सर्वांना मैत्रीनेजोडणारी मराठी भाषा इथे महत्त्वाची भूमिका बजावू शकते 

इंटरनेटच्या या काळात मराठी भाषेचा वापर टिकवायचा आणि वाढवायचा असेल तर साहित्यसंस्कृतीने समृद्धमराठीचे माहितीच्या महाजालातील अस्तित्व उपयुक्त व प्रभावी बनवलं पाहिजे राज्य सरकार स्थानिक प्रशासनसंशोधन संस्था औद्योगिक कंपन्या अन्य संस्थासंघटना आणि सर्वसामान्यांनी हे करायला हवंय लोकशाही नागरिकत्व याबाबत विचार करताना स्थानिक प्रशासनातील कामकाजात सुधारणा आणि त्यादृष्टीने संबंधितांसाठीअनेक नियम वा माहिती स्थानिक भाषेत उपलब्ध असणं व ती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणं आवश्यक असतं .त्याचवेळी ते सर्वसामान्यांना समजू शकेल अशा सोप्या मराठीतून आणि तेही कम्प्युटरवर एका क्लिकवर )उपलब्ध हवं तसंच त्या स्थानिक संस्कृतीतून आलेलं व जीवनव्यवहाराशी संबंधित अनेक प्रकारचं ज्ञानाचं संचितहेही आता डिजिटल असणं गरजेचं आहे . ( थिंक महाराष्ट्र डॉट कॉम या संकेतस्थळामार्फत माहिती संकलनाचं काहीकाम चालू आहे .) हे सर्व कम्प्युटरवर आणताना मराठी भाषेत काम करू शकणाऱ्यांसाठी किमान काही रोजगाराचीहमी निर्माण होऊ शकते तसंच भाषिक क्षमता चांगली असणाऱ्यांना अधिक शिकून पुढे जाण्याची संधी मिळूशकते मराठी मनुष्यबळनिर्मितीचा हा एक मार्ग ठरावा बाळबोध इन्स्क्रिप्ट पद्धतीने कम्प्युटरवरील मराठीचाविस्तार वाढवून महाराष्ट्राला प्रगतिपथावर जाण्याची ही सुवर्णसंधी ठरावी 

इंटरनेटवर माहिती अपलोड करताना तरुणांच्या मदतीने विविध पदांवर कार्यरत असलेल्या मध्यमवयीन तसेचसेवानिवृत्त झालेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या ज्ञानाची व अनुभवाची भर त्यात घालता येईल समाजातील प्रत्येकाचासहभाग कुठे ना कुठे घेत समाजकारण पुढे नेण्याचा हा एक मार्ग ठरेल या प्रक्रियेत संपूर्ण समाजाचे आकलनवाढून त्याचा फायदा समाजालाच होईल सुजाण नागरिकत्वाची जाण यातून निर्माण होऊ शकेल लोकशाही प्रशासनाशी संबंधित बाबींसाठी हे प्रामुख्याने घडायला हवं मराठीतील असा रचनात्मक व कृतिशीललोकसहभाग हा लोकशाहीचा पाया ठरून महाराष्ट्र आणि भारत अधिक सकस लोकशाहीकडे वाटचाल करेल 

मराठीला लाभावे बोलीचे बळ !


विनोद वाघमारे 

मराठी शिकविण्याचा प्रयत्न झाला म्हणून शाळेतून नाव काढण्याची धमकी मिळाली असे सांगितले तर आश्चर्यवाटेल पण ही वास्तविकता आहे बरे हा सर्व खटाटोप अस्सल इंग्रजाळलेल्या कुटूंबानीही केलेला नाही तोघडला आहे आपल्या विदर्भात भाषा केवळ संवादाचे माध्यम राहिलेली नाही तर ती नव्या पिढीच्यारोजगाराची म्हणजेच उत्पन्नाची भाषाही बनली आहे हे सत्य अधोरेखित करणारी ही घटना आहे जिथे प्रमाणमराठीच्या अभ्यासावरच प्रश्नचिन्ह घेतले जातात तिथे बोलीच्या अध्ययनाचा विषय काढायचा तरी कसा ?मराठी राजभाषा दिनानिमित्ताने ग्रामीण भागातील मराठीच्या अस्तित्वावर गांभिर्याने खल होणे आवश्यक आहे 

खरेतर भाषा म्हणजे काय ?... अन्य भाषेतील शब्दांच्या समावेशाने भाषा समृद्ध होईल की गढूळ भाषेचे अस्सलरुप म्हणजे काय संवादाच्या जुन्या माध्यमांचा अभिमान बाळगायचा की सुधारित भाषेचा प्रसार करायचा ?अशा कात्रीत सध्या भाषेचे अध्ययनकर्ते अडकले आहेत इश्वराने भाषा निर्माण केली या एकमेव उत्तराने पूर्वीबहूतेक अभ्यासकांच्या चिंता मिटायच्या आता इश्वर अस्तित्वावरच विविध भाषेतून खल सुरु झाला आहे माणूसचिकित्सक बनला आहे झूंड कळप जाऊन बंगले वसाहती बहरल्या एकीकडे स्वभाषेच्या देखणेपणाचीआत्मियता संपू लागली असून केवळ परकीय भाषेचेच नव्हे तर संस्कृतीचेही पराकोटीचे आकर्षण वाढू लागले आहे .ग्रामीण भागात हे लोण पसरले आहे 

मनोविचार व भावनांच्या अभिव्यक्तीचे प्रभावी साधन म्हणजे भाषा कालमानपरत्वे या भाषेत बदल होत गेले .शब्दांची भर पडत गेली जुन्या भाषेला नव्या शब्दांनी वलय मिळाले असे मानणाऱ्यांचा एक वर्ग आहे जुनीभाषा हिच खरे संवादमाध्यम होय असा हट्ट धरणाऱ्यांचीही कमतरता नाही जुनी भाषा म्हणजे काय ?... बोलीनवी भाषा म्हणजेच प्रमाण शब्दशैली जुन्या आणि नव्यांचा संगम प्रदेशानुसार आढळतो नागरी विकासाचीमाध्यमे प्रगत बनली आणि प्रमाण भाषेच्या प्रदेशातील लोकवस्ती वाढू लागली पर्यायाने बोलीकडे दूर्लक्ष झाले .प्रमाण भाषा ही केवळ बोलण्याची नव्हे तर अध्ययनाचीही अधिकृत भाषा बनली त्यात भाषक आक्रमणांची भरपडली सध्या बोलीप्रदेशातही प्रमाण भाषेचा वपर वाढला असून प्रमाण भाषा किंवा भाषेचा सुधारित स्तरअंगिकारणाऱ्यांच्या प्रदेशात विदेशी भाषांची घुसखोरी वाढली आहे एकूण भाषाशास्त्राच्या अभ्यासकांना केवळमराठीच्याच नव्हे तर बोलीच्या चिंतेनेही ग्रासले आहे असे म्हणणे वावगे होणार नाही लोकांच्या वागण्या -बोलण्यात इंग्रजीचा वापर वाढला आहे इंग्रजीपणाने गावाला घेरले आहे बोलीशी संबंध सांगणारे प्रमाणभाषेकडे वळले आहेत परीक्षांपुरतीच मर्यादित राहील असाही धोका व्यक्त केला जात आहे मराठीला बोलीचेबळ मिळावे अशी चिंता व्यक्त करणाऱ्यांच्या ग्रामीण घरातून अभिजात मराठी हळूहळू हद्दपार होऊ लागली असूननव्या पिढीच्या तोंडच्या इंग्रजी शब्दांचे कौतूक होऊ लागले आहे 

गावखेड्यापर्यंतच्या कॉन्व्हेंटने मराठी संस्कृतीवर आघात केले आहेत पालकांना मराठी शाळा नकोत इंग्रजीतूनशिक्षण हवे आहे आई बाबांचे मम्मी पप्पामध्ये रुपांतरण केव्हाच झाले भंडारा जिल्ह्यातील पवनी येथीलएका कॉन्व्हेंटचा अनुभव पारच बोलका आहे या कॉन्व्हेंटमध्ये विद्यार्थ्यांची मराठी भाषा समृद्ध व्हावी यासाठीविशेष भर दिला जाऊ लागला निमंत्रितांच्या माध्यमातून विद्यार्थी मराठीचे धडे गिरवू लागले महिनाभर हाउपक्रम चालला पालकांनी आक्षेप घेतला आम्हाला मुलांना मराठी नाही तर इंग्रजी शिकवायचे आहे अशीओरड पालकांनी केली कॉन्व्हेंटमध्ये इंग्रजीकडे दुर्लक्ष कसे चालणार असे कारण देत काहींनी मुलांना शाळेतपाठविणे बंद केले बोलीप्रदेशातील मराठीविषयीची ही मानसिकता अंतर्मुख करणारी आहे बोलीचा वापर करूनकुणीही आपला तोटा करून घेण्यास तयार नाही दाक्षिणात्य लोकांना त्यांच्या भाषेचा मोठा आदर आहे इंग्रजीबोलण्याची क्षमता असतानाही त्यांचा संवाद मातृभाषेतून चालतो त्यांना राष्ट्रभाषा हिंदीचेही वावडे आहे .आपल्याकडे मराठी माणूस उगाच हिंदीतून बोलतो हिंदीत इंग्रजी शब्द चालतो मराठीतही इंग्रजी शब्दवापराचेहसे होत नाही असे असताना हिंदी किंवा इंग्रजी बोलताना मराठी शब्दांचा उच्चार आक्षेपार्ह का असावा प्रमाणभाषेत बोलताना बोलीचा एखादा शब्द आला तरी तोही का खटकावा हा विचार राजभाषादिनाला व्हायला हवाएकूणच बोली आणि मराठी यांच्या परस्पर संबंध आणि समन्वयातून मराठी भाषा अधिक समृद्ध झाली आहे हीसमृद्धता वाढण्याचा संकल्प झाला तर फारच उत्तम .

(वर्धा) मराठीसाठी हिंदीत स्वतंत्र विभाग

मराठी भाषेला ज्ञानेश्वर , नामदेव , तुकारामांसारख्या संतांनी लिहिलेले अजरामर साहित्य लाभले . त्याचमराठीचा प्रचार , प्रसार करण्यासाठी लवकरच स्वतंत्र मराइी विभाग सुरू करण्यात येईल , अशी घोषणा महात्मागांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाचे कुलगुरू डॉ . विभूतिनारायण राय यांनी केली .

विभागाच्या स्थापनेसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे . त्याला मंजुरीमिळण्याचे संकेत असून त्यानंतर लगेचच हा विभाग सुरू केला जाईल . मराठी बहुल भागात हिंदीविश्वविद्यालयाचे कामकाज सुरू असल्याचा आनंद वाटतो , असे राय यांनी यावेळी नमूद केले . महात्मा गांधी हिंदीविश्वविद्यालय हे हिंदीसाठी असलेले देशातील एकमेव विद्यापीठ आहे . या विद्यापीठात मराठी विभाग सुरूझाल्यानंतर ते देशातील असे एकमेव हिंदी विद्यापीठ ठरेल , ज्यात मराठीसाठी स्वतंत्र विभाग असेल .
अस्सल मराठी अभ्यासक्रम
विद्यापीठात सध्या मराठीचा डिप्लोमा कोर्स उपलब्ध आहे .
आगामी शैक्षणिक सत्रात मराठीसाठी स्वतंत्र विभाग सुरू होईल .
एमए , एम . फिल , पी . एचडीचे वर्ग विद्यापीठ सुरू करणार आहे .

आता वाचू मराठी!

मुंबई टाइम्स टीम 

आजची तरुणाई मराठी भाषेकडे नेमकं कसं पाहते हे जाणून घेण्यासाठी मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने 'महाराष्ट्र टाइम्स तर्फे एक खास सर्व्हे करण्यात आला. मुंबईसह महाराष्ट्रातील १६ ते २५ या वयोगटातल्या तरुणाईला यात सहभागी करून घेण्यात आलं होतं. मराठी भाषेशी संबंधित असे एकूण २० प्रश्न त्यांना विचारण्यात आले. त्यांनी दिलेल्या विविध प्रकारच्या उत्तरांतून मराठीकडे पाहण्याचा तरुणाईचा दृष्टीकोन स्पष्ट झाला. यातली काही उत्तरं धक्कादायक होती तर काही उत्तरांतून मराठीचं भवितव्य उज्वल असल्याचं दिसून आलं. या संपूर्ण सर्व्हेचा लेखाजोखा खास तुमच्यासाठी... 

श्यामची आई आम्ही वाचलंय हे सांगणाऱ्या मुला-मुलींची टक्केवारी आहे ६५ टक्के... शाळा या कादंबरी वाचणारे आणि त्याचे लेखक मिलिंद बोकिल आहेत हे सांगणारी मुलं-मुली आहेत ३४ टक्के त्याचबरोबर ऐतिहासिक कादंबऱ्या वाचनाची आवड सर्वाधिक आहे हा निष्कर्ष निघालाय महाराष्ट्र टाइम्स ने मराठी भाषा दिनानिमित्त केलेल्या खास सर्व्हेमधून. इंग्रजी वाचन आहेच पण मराठी वाचनाची टक्केवारीही कमी नाही. अर्थात असं असलं तरी मराठी वाचन आणखी वाढवायचं आहे असं निम्म्याहून अधिक मुलांना वाटतंय. मराठीसाठी खूप आशादायी असलेलं चित्र या सर्व्हेमधून समोर आलंय. 

आजची तरुणाई मराठी वाचन करते का मराठी नाटकं पाहते का मराठी ब्लॉग्ज मराठी भाषेबाबत तरुणाईमध्ये किती जागरुकता आहे हे जाणून घेण्यासाठी मटा तर्फे एक खास सर्व्हे करण्यात आला. मुंबई पुणे नाशिक ,औरंगाबाद कोल्हापूर नागपूर या प्रमुख शहरांमध्ये हा सर्व्हे झाला. यात एकूण २० प्रश्न तरुणाईला विचारण्यात आले होते. १६ ते २५ या वयोगटातल्या मुंबईकर मुलं-मुलींना हे प्रश्न विचारण्यात आले. आळंदी कशासाठी प्रसिद्ध आहे या प्रश्नाचं उत्तर ७२ टक्के मुलं-मुलींनी बरोबर दिलं आहे. महाराष्ट्रातल्या बोलीभाषा सांगताना मालवणी ,आगरी खानदेशी अहिराणी अशी उत्तरं तरुणाईने दिली आहेत. विशेष म्हणजे साने गुरुजींचं श्यामची आई हे पुस्तक ६५ टक्के मुलं-मुलींनी वाचलं आहे. तळे राखेल तो पाणी चाखेल या म्हणीचा अर्थ सांगताना मात्र तरुणाईचा थोडा गोंधळ उडाला आहे. ज्याचे श्रम त्याचे फळ ', ' संस्कृतीची जपणूक केली तर पुढल्या पिढीला फायदा होईल अशी उत्तरं दिली आहे. इंटरनेटवर स्वीकारली जाणारी मराठी भाषेची प्रणाली सांगताना अनेकांनी गुगल आकृती शिवाजी मंगल अशी नावं मुलांनी सांगितली आहेत. पण मराठी साहित्यात अजरामर झालेली विनोदी जोडगळी मात्र फार कमीजणांना ठाऊक आहे. चिमणराव-गुंड्याभाऊ हे नाव माहित असलेली मुलं-मुली जेमतेम ५ टक्के आहेत. मराठी ब्लॉग्ज वाचणारी मुलं-मुली असली तरी त्यांची नावं मात्र सांगता आलेली नाहीत. मराठी कादंबऱ्यांची नावं सांगताना मात्र तारांबळ उडाली आहे. त्यातही ययाती ', ' मृत्यूंजय ', ' संभाजी ही नावं आघाडीवर आहेत. इंटरनेटवर मराठी टायपिंग करणारी तरुणाई २७ टक्के आहे. 
मराठी नाटकं पाहणारी तरुणाई मात्र मोठ्या संख्येने दिसून येते. 

सर्वेक्षण 

दादासाहेब फाळके कोण होते रे भाऊ 

महाराष्ट्र टाइम्स च्या सर्वेक्षणात निघाले मराठी संस्कृतीचे वाभाडे 

मराठी साहित्यातील गाजलेली जोडगोळी म्हणजे अशोक सराफ - लक्ष्मीकांत बेर्डे विभा शिरवाडकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे. दादासाहेब फाळके हे नाव पुरस्काराशी संबंधित आहे. मराठी दिन १३ मार्चला साजरा करतात यासारखी थक्क करणारी उत्तरे देऊन तरुण पिढीने आपले मराठी भाषेबाबतचे अगाध ज्ञान उघड केले आहे. मराठी भाषा गौरव दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र टाइम्स ने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्षात मराठी संस्कृतीबाबत अनास्था वाढल्याचे दिसत आहे. 

औरंगाबाद शहरातील विविध महाविद्यालयांच्या इयत्ता दहावी बी. एड. अभियांत्रिकी बी. एसस्सी बी. कॉम या वेगवेगळ्या शाखांतील शंभर विद्यार्थ्यांकडून २० प्रश्नांची प्रश्नावली भरुन घेण्यात आली आहे. या सर्वेक्षणात महाराष्ट्र आणि मराठी संस्कृतीबद्दल मुलांना सामान्य माहिती नसल्याचे आढळले. आळंदी येथे संत ज्ञानेश्वरांची समाधी आहे. पण अनेकांनी आळंदी हे ज्ञानेश्वरांचे जन्मगाव असल्याचे तर काहींनी तिथे त्यांचे मंदिर असल्याचे नमूद केले आहे. बालवाचकांवर गारुड केलेल्या फास्टर फेणे बाबत एकाही वाचकाला माहिती नाही. फास्टर फेणे हा उमदा नायक घडविणाऱ्या भा. रा. भागवत यांचाही विसर या पिढीला पडला आहे. ज्ञानपीठ पुरस्कार आतापर्यंत कुणाला मिळाला आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर फक्त तिघांनी दिले आहे. महर्षी कर्वे आशा भोसले पु. ल. देशपांडे अशी चुकीची उत्तरे अनेकांनी लिहिली आहेत. मराठी साहित्यात चिं. वि. जोशी यांनी चिमणराव-गुंड्याभाऊ ही जोडगोळी प्रसिद्ध केली आहे. मात्र मराठी साहित्यातील प्रसिद्ध जोडगोळी म्हणून बहुतेकांनी अशोक सराफ- लक्ष्मीकांत बेर्डे उत्तर लिहिले आहे. यावरुन नव्या पिढीचे वाचन अत्यल्प झाल्याचे ठळकपणे या सर्वेक्षणात दिसते. कोणत्याही पाच मराठी कादंबऱ्या आणि त्यांचे लेखक व कोणतीही पाच मराठी नाटके आणि त्यांचे लेखक या दोन प्रश्नांची उत्तरे एकाही विद्यार्थ्याला माहीत नव्हते. मराठी ब्लॉग्ज वाचणाऱ्यांची संख्याही शून्य आहे. श्यामची आई या पुस्तकाची लोकप्रियता कायम आहे. अनेकांनी हे पुस्तक वाचल्याचे आवर्जून नोंदवले आहे.तळे राखेल तो पाणी चाखेल या म्हणीचा अर्थ फक्त २२ जणांनीच दिला आहे. 

मराठीची बोंबाबोंब 

मराठी साहित्य संस्कृती महाराष्ट्राबाबत कोरी पाटी असलेल्या नव्या पिढीचे मराठीचे ज्ञान यथातथाच आहे. लिखित मराठीसुद्धा वाभाडे काढणारी आहे. कारोभार(कारभार) ऐराणी (अहिराणी) अशा शेकडो चुका सर्वेक्षणात दिसतात. महाराष्ट्राच्या तीन बोलीभाषा म्हणून अनेकांनी मराठी हिंदी व इंग्रजी असे उत्तर लिहून बोलीभाषांचे अस्तित्वच धोक्यात आणले आहे. 

१) आळंदी कशासाठी प्रसिद्ध आहे 

५९ 

२) मराठी साहित्यात आजवर ज्ञानपीठ कोणत्या साहित्यिकांना मिळाले आहे 

तीन 

३) महाराष्ट्रातील कोणत्याही तीन बोलीभाषा सांगा 

सोळा 

४) श्यामची आई हे पुस्तक तुम्ही वाचले आहे का ते कुणी लिहिले आहे 

६७ 

५) दादासाहेब फाळके हे नाव कोणत्या संदर्भात प्रसिद्ध आहे 

६८ 

६) शाळा या कादंबरीचे लेखक कोण 

२२ 

७) मराठी भाषा कोणत्या लिपीमध्ये लिहिली जाते 

७३ 

८) कोणत्या मराठी चित्रपटाची भारताकडून ऑस्करवारीसाठी निवड झाली होती 

५९ 

९) मराठी भाषा दिन कधी असतो. त्या दिवसाचे महत्त्व सांगा 

५६ 

१०) तळे राखेल तो पाणी चाखेल या म्हणीचा अर्थ सांगा 

२३ 

११) लॉरेल-हार्डीप्रमाणे मराठी साहित्यात अजरामर झालेली विनोदी जोडगोळी कोणती 

सहा 

१२) फास्टर फेणेच्या कथा तुम्ही वाचल्या आहेत का. त्या कुणी लिहिल्या आहेत 

शून्य 

१३) तुम्ही ई-मेल करताना सोशल नेटवर्किंग साइटवर मराठीत टायपिंग करता का 

२२ 

१४) शिवकालीन मराठी कोणत्या लिपीमध्ये लिहीली आहे 

४४ 

१५) कोणत्याही पाच मराठी कादंबऱ्या आणि लेखकांची नावे सांगा 

शून्य 

१६) कोणत्याही पाच मराठी नाटकांची आणि त्यांच्या लेखकांची नावे सांगा 

शून्य 

१७) तुम्ही मराठी ब्लॉग्ज वाचता का त्यातील किमान दोन ब्लॉग्जची नावे सांगा 

शून्य 

१८) दया पवार लक्ष्मण माने शरणकुमार लिंबाळे ही नावे कशाशी संबंधित आहे 

चार 

१९) इंटरनेटवर सर्वत्र सहजपणे स्वीकारली जाणारी मराठी भाषेची प्रणाली कोणती आहे 

एक 

२०) महाराष्ट्र दिन कधी असतो 

८३ 
----------- 

ऐतिहासिक कादंबऱ्या आवडीच्या 

प्रश्नावलीत विचारलेल्या या १६ प्रश्नांबरोबरच आणखी ४ प्रश्नही तरुणाईला विचारण्यात आले होते. त्यापैकी पहिला प्रश्न होता की ,' मराठी साहित्यात आजवर ज्ञानपीठ कोणत्या साहित्यिकांना मिळाले आहे ?' या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे वि.स.खांडेकर कुसुमाग्रज आणि विं.दा.करंदीकर. परंतु एकाही मुला-मुलीला ही तिन्ही नावं सांगता आली नाहीत. निम्म्याहून अधिक मुला-मुलींनी या प्रश्नाचं उत्तरच दिलं नाही. तर ज्यांनी उत्तर दिलं त्यात सर्वाधिक मुला-मुलींनी कुसुमाग्रज यांचं नाव घेतले आहे. तर वि.स. खांडेकर हे उत्तर अवघ्या दोनच मुलांनी दिलं आहे. कवी विं.दा.करंदीकर यांनाही ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे हे फार थोड्याच मुला-मुलींना ठाऊक असल्याचं दिसलं. काही मुला-मुलींनी कुसुमाग्रज आणि विं.दा.करंदीकर ही दोन नावं उत्तरांत सांगितली आहेत. 
कोणत्याही पाच मराठी कादंबऱ्या आणि लेखकांची नावं सांगा असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देतानाही पाच कादंबऱ्या आणि त्यांचे लेखक कुणालाही सांगता आले नाहीत. जवळपास ५० टक्के मुलांनी हा प्रश्न सोडूनच दिला आहे. तर ज्यांनी उत्तरं दिली आहेत त्यापैकी बहुतांश मुलांनी फक्त पुस्तकांची नावं सांगितली आहेत. लेखकांची नावं अनेकांना सांगता आलेलीच नाहीत. त्यातही मुलं ऐतिहासिक कादंबऱ्याच अधिक वाचतात असं चित्र आहे. ययाती ', ' स्वामी ', ' पानिपत ', ' संभाजी ', ' मृत्यूंजय या कादंबऱ्यांना विशेष पसंती मिळत असल्याचं दिसून येतंय. 

कोणत्याही पाच मराठी नाटकांची आणि त्यांच्या लेखकांची नावं सांगा या प्रश्नाचं नेमकं उत्तर कुणीही देऊ शकलेलं नाही. कारण जवळपास ६० टक्के मुला-मुलींनी पाच नाटकांची नावं सांगितली आहेत. पण त्यांच्या लेखकांची नावं मात्र एक-दोनच ठाऊक आहेत. नाटकांच्या नावांमध्ये सर्वात आघाडीवर आहे सही रे सही हे नाटक. त्यानंतर लोच्या झाला रे ', ' श्रीमंत दामोदरपंत ', ' एका लग्नाची गोष्ट ', ' लेकुरे उदंड झाली ', ' वाऱ्यावरची वरात ', ' गाढवाचं लग्न ', ' अश्रूंची झाली फुले ', ' नटसम्राट या नाटकांची नावं मुलांनी सांगितली आहेत. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे गेल्या दोन-चार वर्षांत रंगभूमीवर आलेल्या नाटकांची नावं मुला-मुलींच्या तोंडी आलेली नाहीत. दया पवार लक्ष्मण माने शरणकुमार लिंबाळे ही नावं कशाशी संबंधित आहेत असं विचारल्यावर जेमतेम ६ टक्के मुलांना याचं उत्तर देता आलं आहे. इतर मुलांनी तर या प्रश्नाचं उत्तर देणं टाळलं आहे. 
-------------- 

अशोक-लक्ष्या अजरामर जोडी 

काही प्रश्नांना दिलेली उत्तरं वाचली की हसावं की रडावं असा प्रश्न पडतो. याचं सर्वात ठळक उदाहरण म्हणजे मराठी साहित्यात अजरामर झालेली विनोदी जोडगळी कुठली याचं उत्तर बऱ्याच मुला-मुलींनी अशोक सराफ-लक्ष्मीकांत बेर्डे असं दिलं आहे. इतकंच नव्हे तर वैभव मांगले-आनंद इंगळे या आजच्या विनोदी नटांची नावंही काही मुलांनी सांगितली आहेत. त्याशिवाय काळू-बाळू जाड्या-रड्या अशी नावंही लिहिली आहेत. महाराष्ट्रातल्या तीन बोलीभाषांबद्दल सांगताना काही मुंबईकर मुला-मुलींनी मराठी हिंदी गुजराती इंग्रजी असं सांगितलं. आळंदी कशासाठी प्रसिद्ध आहे हे सांगताना चार-पाच मुलांनी तुकाराम महाराजांचं नाव घेतलं. दादासाहेब फाळके हे नाव कोणत्या संदर्भात प्रसिद्ध आहे या प्रश्नाचं उत्तर देताना १० टक्के मुलांना फक्त फाळके पुरस्कार 'आठवला. ऑस्करवारीसाठी गेलेल्या मराठी सिनेमाचं नाव सांगताना नटरंग पासून ते जोगवा ', ' अजिंठा पर्यंत काही सिनेमांची नावं मुलांनी घेतली आहेत. तर मराठी साहित्यात आजवर ज्ञानपीठ पुरस्कार कुणाला मिळालाय हे सांगताना दोन-तीनजणांनी चक्क संगीतकार श्रीनिवास खळे यांचं नाव घेतलंय. मराठी भाषा दिन कोणता या प्रश्नाचं उत्तर देताना दोघांनी चक्क २७ एप्रिल असं उत्तर दिलंय.

प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच गरजेचं



वर्षा किडे कुळकर्णी 

पुढील वर्षीच्या शैक्षणिक सत्रात प्रवेश घेण्यासाठी शाळांच्या जाहिराती सध्या सुरू झाल्यात काही दिवसांनी लेखीपरीक्षा मुलाखती बंदी असली तरी लपून छपून होतातच हे सर्व सोपस्कार आटोपतील ज्यांना इच्छितशाळेत प्रवेश मिळेल त्यांच्या पालकांना अगदी कृतकृत्य झाल्यासारखं वाटेल कारण हल्ली मुलांचा शाळेत प्रवेशघेणं हे फार मोठ्ठ दिव्य कर्म व यक्ष प्रश्न होवून बसलाच काही आनंदी तर काही निराश होतील 

आता सर्वच शाळांमधून इयत्ता १ ली पासूनच इंग्रजी सक्तीचं केलयं काय तर म्हणे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीयपातळीवरील स्पर्धेत इंग्रजी येत नसेल तर मुलं मागे पडतात आपल्या देशातच इंग्रजी शिकलं नाही तर फारअडतं पण चीन जपान फ्रान्स जर्मनी व इतर कितीतरी देशाचं काम इंग्रजी वाचून अडत नाही नाविद्यार्थ्यांचं कारण त्यांच्या देशात विज्ञान तंत्रज्ञान व इतर सर्व शास्त्राचं ज्ञान हे त्यांच्या त्यांच्या राष्ट्रीय भाषेतूनवा बोलीभाषेतून उपलब्ध झालेलं आहे तरी इंग्रजीशिवाय त्यांनी अचाट प्रगती केली आहे याला कारणराष्ट्राभिमान तसेच भाषाभिमान त्यांच्या नसानसात भिनला आहे त्यांच्या राष्ट्रप्रमुखांना इतर देशांमध्ये गेल्यासत्यांच्या राष्ट्रीय भाषेत बोलताना भाषण देताना कमीपणा वाटत नाही आपल्या येथे याऊलट चित्र दिसतयं .देशातच इंग्रजी भाषणाशिवाय होत नाही 

एक भाषा म्हणून इंग्रजी शिकण्याला माझा विरोध नाही पण सर्वच व्यवहार इंग्रजीमध्ये नकोत इंग्रजी भाषेचाकुबड्यांचा आधार न घेता मुलांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत टिकून राहता येईल असं भाषिक व शैक्षणिकधोरण आखायला हवं त्यासाठी स्थानिक भाषेत सर्व ज्ञान उपलब्ध व्हायला हवं पण आज चित्र उलटं दिसतयं .इंग्रजी माध्यमाचं प्रश्न वाढल्याने मराठी माध्यमांच्या शाळा ओस पडल्यातं प्रत्येक राज्यातील स्थानिक भाषांचीहीच स्थिती आहे माझ्या मते प्राथमिक शिक्षण तरी फक्त मातृभाषेतूनच दिल जावं मग ती भाषा मराठी हिंदीपंजाबी कानडी तामिळ असो 

मागील वर्षी देशाचे माजी राष्ट्रपती डॉ ए पी जे अब्दुल कलमाचं एका शैक्षणिक संस्थेत नागपूरला )भाषण ऐकलं तर त्यांनाही भाषणात प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच हवं यावर भर दिला माझे आवडते शिक्षकहे माझे प्राथमिक शाळेतीलच शिक्षक आहेत हे आवर्जून विद्यार्थ्यांना सांगितले त्या शिक्षकांनी कलमांना केलेलाउपदेश व त्यांच्या आठवणीही विद्यार्थ्यांना सांगितल्या कलमांच्या मतांचा विचार होणं ही काळाची गरज आहे .कारण आजही ते स्वत एक शिक्षक म्हणूनच कार्यरत आहेत 

मुलं कुटुंबातूनच खूपशा गोष्टी शिकत असल्याने कुटुंब हीच त्याची पहिली शाळा व आई प्रथम गुरू असते मुलंआपले विचार भावना मातृभाषेतूनच उत्तम रितीने प्रकट करू शकतातं साहजिकच त्याचा भावनिक व भाषिकपाया मजबूत होवून त्याला मातृभाषेविषयी अभिमान वाटतो मातृभाषेतूनच त्याला आपली संस्कृती परंपरा ,इतिहास थोर पुरूष शास्त्रज्ञ साधुसंत देवीदेवता पौराणिक साहित्य तसेच कवी लेखक नाटककार यांनीलिहलेलं साहित्य वाचण्याची गोडी निर्माण होते पण हल्ली इंग्रजीच्या प्रभावामुळे मातृभाषेतील साहित्यवाचण्याची आवडच राहिली नाही नव्हे त्याबाबत ते अनभिज्ञ असतात पण इंग्रजी कवी लेखक गायक नट ,चित्रपट खेळाडूंविषयी इत्यंभूत माहिती असते मुलांना अडीच ते तीन वर्षापासून इंग्रजी कानावर पडल्यावरदुसरं काय होणार 

इंग्रजी भाषा आंतरराष्ट्रीय भाषा असली तरी तिचं शिक्षण अगदी प्राथमिक वर्गांपासून देणं गरजेच मुळीच नाही .पूर्वी ५ वी ८ वीत इंग्रजी माध्यम घेता येत असे ते विद्यार्थीही आज आपआपली क्षेत्रे गाजवत आहे विदेशातहीनाव कमावत आहेत मुलांची बौद्धिक क्षमता न बघता मुलांना इंग्रजी माध्यम दिले जातं कारण पालकांनाहीवाटतं पाल्याने विदेशात जावं मुलांवर बौद्धिक तर पालकांवर आर्थिक भार पडतो कारण इंग्रजी माध्यमांच्याशाळांचा सरंजाम जास्तच असतो अगदी आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या रोजीने काम करणाऱ्या कामकरीवर्गातील पालकांनाही वाटतं आपल्या मुलांनी मोठ्ठ व्हावं शिकावं आपण शिकू शकलो नाही तर त्यांनी आपलंस्वप्न पूर्ण करावं यासाठी तेही मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत घालतात पण त्यासाठी त्यांच्यावर प्रचंडआर्थिक भार पडतो आजपर्यंत अनेक शिक्षणतज्ज्ञांनी मानसोपचार बालरोगतज्ज्ञांनी मातृभाषेतूनच शिक्षणदिलं जावं असं आवर्जून व वारंवार सांगितलंय पण लक्षात कोण घेतयं मराठी भाषेला पुन्हा चांगले दिवसयेण्यासाठी मराठी शाळांची दयनीय स्थिती बदलण्यासाठी इंग्रजीच्या प्रभावाने भारतीय संस्कृतीवर झालेलंसांस्कृतिक भाषिक आक्रमण दूर करण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलायला हवीत यादृष्टीने राज्याचेशिक्षणमंत्री काही उपाययोजना करतील काय त्यासाठी ठोस शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी व्हायला हवी .अन्यथा मराठी भाषेची स्थिती बदलणार नाही दरवर्षी २७ फेब्रुवारीला मराठी राजभाषा दिन कागदोपत्रीसाजरा करून काय फायदा ?


मराठीला अभिजात दर्जा द्या

पुणेः अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्यासाठी आवश्यक असलेले सर्व प्रकारचे निकष पूर्ण करणारा अहवाल ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांच्या समितीने राज्य सरकारकडे सादर केला आहे. मुख्यमंत्र्यांनी हा अहवाल केंद्र सरकारकडे पाठवावा अशी मागणी आमदार माधुरी मिसाळ यांनी केली आहे. पुणे विद्यापीठात मराठी भाषा भवन स्थापन करावे आणि मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली अभिजात मराठी भाषा समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या अहवाल लेखनाचे काम पूर्ण झाले आहे. हा अहवाल मुख्यमंत्र्यांनी आता केंद्र सरकारकडे पाठविण्याची गरज आहे अशी माहिती मिसाळ यांनी दिली. अमराठी भाषिकांसाठी मराठी भाषा पटकथा लेखन ग्रंथर्निर्मिती व्यवहार सुरू करावा ,अशी मागणी पुणे विद्यापीठाकडे केली आहे. या दोन्ही मागण्यांसाठी राज्यपाल के. शंकरनारायन यांची भेट घेऊन निवेदन देणार असल्याचे मिसाळ यांनी सांगितले.

मराठीच्या प्रश्नांवर बिगर राजकीय संघटना हवी



मराठी टक्का चर्चासत्रात मान्यवरांचे मत 

म टा प्रतिनिधी मुंबई 

मराठी माणसांचे प्रश्न हे प्रामुख्याने निवारा आणि रोजगाराशी संबंधित आहेत त्यासाठी मराठी माणसांना बळदेण्याची गरज असून राजकीय सामाजिक आर्थिक शैक्षणिक अशा सर्वच पातळ्यांवर मराठी अस्मिता जपणारीएक बिगर राजकीय संघटना स्थापन करण्याची गरज आता निर्माण झाली आहे असे मत मुंबई काँग्रेसचे माजीसरचिटणीस अजित सावंत यांनी व्यक्त केले 

मराठी भाषा दिनानिमित्त पार्ले पंचम संस्थेतर्फे मुंबईतून मराठी टक्का घसरतोय काय ?' या विषयावर पार्लेटिळक शाळेत आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात सावंत बोलत होते यावेळी अॅड किशोर जावळे यांनी ,जेव्हा मराठी माणूस आर्थिक क्षेत्रात वर्चस्व स्थापन करील तेव्हा परप्रांतीय टक्का आपसूकच कमी होईल असादावा केला मराठी टक्का घसरण्याच्या राजकारणामागचे अर्थकारण समजून घ्या असेही ते म्हणाले 

शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी एखाद्याला चोर म्हटल्यावर प्रसारमाध्यमे जेवढी प्रसिद्धी देतात तेवढीविधानसभेत मराठीसाठी आवाज उठविल्यास देत नाहीत अशी खंत व्यक्त केली मराठी माणसाला धंद्यातआणण्यासाठी किती प्रयत्न करायचे असा सवाल करत मराठी माणूस स्वतःच्या व्यवसायाच्या जागा परप्रांतीयांनाभाड्याने देतो असा स्पष्ट आरोप त्यांनी केला तर राजकीय उदासीनेतमुळे मुंबईतील मराठी टक्का कमी होतअसल्याचा हल्ला दीपक पवार यांनी चढवला 

नितीन सरदेसाई यांनी मराठी माणसांची मानसिकता पराभूतांची असल्याचे मत व्यक्त केले . ' अंथरूण बघून पायपसरा ', ' लुळ्यापांगळ्या श्रीमंतीपेक्षा धट्टीकट्टी गरिबी बरी अशा म्हणी या त्याच मानसिकतेची लक्षणे असूनमराठी अस्मिता ही अर्थकारणाशी निगडीत असली पाहिजे असे त्यांनी ठामपणे सांगितले माझ्याकडे येणारे ९०टक्के लोक नोकरीच्या मागणीसाठी येतात नोकरी एकट्याला मिळेल मात्र व्यवसाय केल्यास तो शंभर लोकांनारोजगार देऊ शकेल असे सरदेसाई यांनी सांगितले . ' महाराष्ट्र टाइम्स चे नितीन चव्हाण व लोकसत्ता चेनिशांत सरवणकर यांनी या मान्यवरांशी संवाद साधला संस्थेचे अध्यक्ष श्रीधर खानोलकर यांनी प्रास्ताविक केले



राजभाषेसाठी सरकारकडे वेळ नाही
भाषा विभागासंबंधीचा प्रस्ताव अडीच वर्षे धूळ खात पडून 

मनीषा नित्सुरे जोशी 

मराठीच्या विकासाला गती देण्यासाठी एखादी सर्वोच्च यंत्रणा असावी अशी तरतूद राज्य मराठी विकास संस्थेच्याघटनेमध्ये असली तरीही त्यादृष्टीने ठोस पाऊल उचलणे राज्य सरकार टाळत आहे मराठीच्या नियोजन ,नियमनासाठी राजभाषा मराठी विभागाच्या कारभाराला गती आणण्याच्या दृष्टीने मराठी अभ्यास केंद्रानेसरकारकडे सादर केलेला प्रस्ताव गेली अडीच वर्षे धूळ खात पडून आहे त्यावर निर्णय घ्यायला सरकाकडे वेळचनाही 

एप्रिल २०१०मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण व उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार मराठीअभ्यास केंद्राने राजभाषा मराठी विभाग कसा असावा त्याचे काम कसे चालावे याबाबतचा प्रस्ताव सरकारलासादर केला होता भाषा संचालनालयासह सध्या अस्तित्वात असलेल्या व नव्याने स्थापन करावयाच्याभाषाविषयक यंत्रणांच्या प्रश्नांचीही त्यात चर्चा होती त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी यासंबंधी निर्देशही काढलेहोते मात्र त्यांचीही अंमलबजावणी झाली नाही एप्रिल २०१० पासून अगदी आजपर्यंत अभ्यास केंद्रानेसरकारदरबारी तब्बल १० वेळा हा प्रस्ताव सादर केला आहे मात्र तो लालफितीत अडकून आहे मुख्यमंत्र्यांच्याभेटीची वेळ मिळविण्यासाठी अभ्यास केंद्राचे शिष्टमंडळ गेले तीन महिने प्रयत्न करत आहे या संदर्भात संबंधितअधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत 

मराठी भाषा विभागाची सद्यस्थिती 

विद्यापीठ ग्रंथ निर्मिती मंडळ बंद 

राज्य मराठी विकास संस्थेच्या मुंबई विभागातील ७ कर्मचारी गेल्या १५ वर्षांपासून अस्थायीच 

माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मराठीचा अंतर्भाव करण्यासाठी यंत्रणाच नाही 

'' राजभाषा मराठी विभागाच्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी इतकी वर्षे लागावीत इतकी सरकारची यंत्रणा संथआहे का प्रस्ताव टाकाऊ असेल तर तसे सरकार आम्हाला ठोसपणे का सांगत नाही आणि लोकांपुढे चर्चेला काघेत नाही ?'' 

दीपक पवार अध्यक्ष मराठी अभ्यास केंद्र )

मराठीचा स्वीकार व्हावा: कोतापल्ले

मराठीची सद्यस्थिती आणि लोकव्यवहारात तिचा अधिकवापर वाढवण्याबाबत मराठी भाषा सल्लागार समितीचेअध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉ नागनाथ कोत्तापल्ले यांच्याशी साधलेला संवाद ... 

मराठी भाषा सल्लागार समितीच्या माध्यमातून काय काम केले जाणार आहे 

दिवंगत मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या कार्यकाळात मराठी भाषा सल्लागार समिती स्थापन करण्यात आलीहोती पण १९८०नंतर समिती नेमली गेली नाही आता दोन वर्षांपासून काम सुरू झाले आहे समितीची मुख्यतीन कामे आहेत शासनाला भाषाविषयक प्रश्नावर सल्ला देणे आपली भाषा विविध ज्ञानशाखांना सामोरीजाण्यासाठी सिद्ध करणे आणि पुढील २५ वर्षांचे मराठी भाषेचे धोरण ठरविणे या अंतर्गत वेगवेगळ्याविषयातील कोश तयार करण्यासाठी ४० ४५ विषयांची यादी काढली आहे यात भूगोल वाणिज्य राज्यभाषाव्यवहार सौंदर्य प्रसाधने योगशास्त्र सूक्ष्म तंत्रज्ञान अॅग्रो इंजिनीअरिंग या विषयांचा समावेश आहे राज्यशासनाकडे प्रस्ताव पाठवला असून त्याला मंजुरी मिळाल्यानंतर तज्ज्ञ शोधून कामाला सुरूवात होईल 

लोकव्यवहारात मराठीचा पुरेसा वापर करण्यात स्थलांतराचा अडथळा येतो का ?
उत्तर भारत केरळ राज्यांतून काहीजण महाराष्ट्रात आले आहेत तर नोकरी व्यवसायानिमित्त काहीजणमहाराष्ट्रातून इतर राज्यात गेले आहेत हे प्रमाण केवळ दोन ते तीन टक्के आहे या प्रमाणात फरक पडत नाही यानगण्य प्रमाणासाठी मराठीच्या आग्रहाला मुरड घालणे शक्य नाही पूर्वीच्या काळी इंग्रज अधिकाऱ्यांनाही मराठीभाषा येणे बंधनकारक होते सध्या दुसऱ्या राज्यातील अधिकाऱ्यांना स्थानिक भाषा आत्मसात करावीच लागते .लोकव्यवहारात स्थलांतरामुळे मराठीचा वापर कमी होऊ शकत नाही 

प्रमाणभाषेचा आग्रह कितपत योग्य वाटतो 

मराठीच्या शुद्धतेचा आग्रह म्हणजे ऐतिहासिक गोष्टी समजून घेणे आहे . ' निशाण ', ' अडकित्ता ', ' साबण यासारखेपरक्या भाषेतील अनेक शब्द मराठीत रुजले आहेत भाषा पुढे जाते तेव्हा आपले रूप बदलत असते एखादीभाषा समृद्ध होते तेव्हा ती इतर भाषांतील शब्द घेते मराठीनेही अनेक शब्द घेतले आहेत ही निरंतर प्रक्रियाआहे 

मराठीसारखी अवस्था सर्व भारतीय भाषांची आहे का 

देशातील सर्व भाषांत अस्तित्त्वाचा प्रश्न आहे कारण भारतीय माणूस दुसऱ्यांवर फार अवलंबून आहे तंत्रज्ञानआम्ही आयात करीत असतो काही गोष्टी सहजपणे मिळतात असे वाटत असले तरी त्यासाठी जबर किंमत मोजावीलागते इंग्रजीचा बाऊ केला जातो पण इंग्रजीचे आक्रमण होत आहे की ते आपण लादून घेत आहोत याचा विचारव्हावा इंग्रजी आत्मसात करण्याला विरोध नाही पण त्यामुळे मातृभाषेकडे दुर्लक्ष करू नका 

तरुण पिढीला मराठी संस्कृती भाषेबाबत सामान्य माहितीही नाही ... 

या प्रश्नाचे उत्तर अर्थव्यवहारात आहे जागतिकीकरणातून सर्व व्यवस्था भांडवलदारांच्या हाती गेली आणिचंगळवाद उदयाला आला यातून ही पिढी मराठीपासून तूटत चालली आहे 

मराठीचे भवितव्य उज्ज्वल ठेवण्यासाठी काय आवश्यक आहे 

मराठी भाषेचे भवितव्य उज्ज्वलच आहे मराठी वर्तमानपत्रे पुस्तकांचा खप वाढला आहे राज्यातील ९० टक्केमुले मराठी शाळांत शिकतात अगदी अमेरिकेतही १० टक्क्यांपेक्षा अधिक वाचक नसतात त्यामुळे मराठीतचांगली स्थिती आहे प्रत्येक जिल्ह्यात आदर्श मराठी शाळा शासनाने सुरू करावी असा आग्रह आहे याबाबतच्याप्रस्तावावर चर्चा सुरू आहे मराठी भाषेचे भवितव्य उज्ज्वल आहे .


माय मराठी न्याय मराठी व्हावी

गुजरात राजस्थान उत्तर प्रदेश मध्य प्रदेश बिहार तामिळनाडू आंधप्रदेश या राज्यांमधील हायकोर्टांच्याकामकामात प्रादेशिक भाषेचा रीतसर वापर होत आहे हे लक्षात घेता महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने मुंबईहायकोर्टाची मराठी ही प्राधिकृत भाषा करण्याचा प्रस्ताव मंजूर करावा असे आवाहन मराठी भाषा संरक्षण विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शांताराम दातार यांनी केले आहे 

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जन्मशताब्दी येत्या १२ मार्च रोजी संपत आहे ज्ञान -विज्ञानाची भाषा मराठी असावी हे यशवंतराव चव्हाण यांचे स्वप्न साकार करण्यासाठी आता मंत्रिमंडळाने पुढाकारघ्यावा असे दातार यांनी सुचविले आहे राज्यातील जिल्हास्तर कनिष्ठ कोर्टांमध्ये मराठीचा वापर व्हावा यासाठीराज्य सरकारने २१ जुलै १९९८ रोजी अधिसूचना काढली होती मुंबई वगळता राज्याच्या उर्वरित जिल्ह्यांमधीलकोर्टांमध्ये ५० टक्के काम मराठीत चालविण्याचा निर्बंध अधिसूचनेत घालण्यात आल्याने अनेक जिल्हा कोर्टांतूनमराठीतून निकालपत्रे दिली जातात तथापि दिवाणी व फौजदारी कायदा मॅन्युअलमध्येच इंग्रजी अथवा मराठी हापर्याय ठेवण्यात आल्याने अधिसूचनेशी विसंगत अशा तरतुदी दूर करण्याची आवश्यकता दातार यांनी व्यक्त केली 

लघुलेखक टंकलेखक व मराठीतून कायद्याची पुस्तके आदींवर सरकार भर देत असले तरी इतपत प्रगती पुरेशीनसल्याचे सांगत माय मराठी ही न्याय मराठी झाली पाहिजे असे मत अॅड अनिरूद्ध गर्गे यांनी व्यक्त केले .